नवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार

मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात  दोन ठार तर दोन जखमी झालेत. 

Updated: May 20, 2016, 10:32 PM IST
नवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार title=

रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात  दोन ठार तर दोन जखमी झालेत. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आज झाला. अपघातग्रस्त कुटुंब नवी मुंबईतील आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे जोशी कुटुंब देवगडहून मुंबईकडे येत होते. पोलादपूर ते कशेडी घाटादरम्यान कार चाकलाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात दोन महिलांचा मृत्यू झाला. एक महिला जागीत ठार झाली तर दुसऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
 
मिनल रामचंद्र जोशी (५१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रामचंद्र शंकर जोशी आणि मुलगा राहुल आणि सरस्वती गणपत जोशी हे तिघे जखमी झालेत.  या अपघाताची नोंद पोलदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आलेय. पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोकल तपास करीत आहेत.