...तर मुंबईचे पाणी रोखू - मधुकर पिचड

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर आदिवासी भागातून मुंबईला जाणार पाणी आडवू असा गर्भित इशारा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी राज्यसरकारला दिला. 

Updated: Feb 13, 2015, 05:37 PM IST
...तर मुंबईचे पाणी रोखू - मधुकर पिचड  title=
छाया - डीएनए

नाशिक : आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर आदिवासी भागातून मुंबईला जाणार पाणी आडवू असा गर्भित इशारा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी राज्यसरकारला दिला. 

नाशिकमध्ये आयोजित आदिवासी प्रबोधन मेळाव्यात पिचड बोलत होते. आदिवासी नेत्यांना भेट देत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस हे काय बाबासाहेब आंबेडकर आहेत काय..? राज्य घटनेचा अवमान करू नका. या आधी मी मंत्री होतो मात्र आता मोकळा झालोय असा आक्रमक पवित्रा पिचड यांनी घेतलाय.  

तसचं झारखंड छत्तीसगडच्या धर्तीवर आदिवासी साठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची आणि आदिवासींच्या लढ्याची सुरवात करणाऱ्या विरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची मागणी ही मधुकर  पिचड यांनी मेळाव्यात केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.