उस्मानाबादमध्ये पावसाचा कहर

पावसानं सर्वदूर धुमाकुळ घातलाय. उस्मानाबादमध्ये सारोळा, दारफळ, दाऊतपूर, राजुरी, सांगवी आणि कामेगाव परिसरात सर्वच नदी नादे दुथडीपार झालेत. 

Updated: Oct 2, 2016, 08:43 AM IST
उस्मानाबादमध्ये पावसाचा कहर title=

उस्मानाबाद : पावसानं सर्वदूर धुमाकुळ घातलाय. उस्मानाबादमध्ये सारोळा, दारफळ, दाऊतपूर, राजुरी, सांगवी आणि कामेगाव परिसरात सर्वच नदी नादे दुथडीपार झालेत. 

नद्यांचं पाणी अनेक शिवारात घुसलंय. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

शेतीचंही मोठं नुकसान या पावसामुळे झालंय. काही ठिकाणी भींती पडण्याच्या घटनाही घडल्यात. अनेक गावांचाही संपर्क तुटलाय.