कोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर

पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे.  खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय. 

Updated: Sep 23, 2016, 07:45 AM IST
 कोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर title=

रत्नागिरी : पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे.  खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय. 

चोरद नदीला पूर आल्याने 32 गावांचा संपर्क तुटला आहे. खेड येथील बिजघर पुलावरुन एक युवक वाहून गेलाय. नारंगी नदीला पुर आल्यामुळे दापोली ते खेड या मार्गावरील वाहतूकही पावसामुळे ठप्प झाली आहे. खेड परिसरात मुसळधार पावसाने शहराच्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे महामार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच चिपळूणच्या वाशिष्टी नदीला देखील पूर आलाय. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खेड येथे अडवण्यात आलीय तर गोव्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक चिपळूणच्या बाहदूरशेख नाक्यात अडवण्यात आलीये. 

एसटीने आपल्या सर्व गाड्या चिपळूणच्या शिवाजीनगर स्थानकात उभ्या करून ठेवल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक सुरू केली जाणार नसल्याची माहिती वाहतूक निंयत्रकांनी दिली आहे.