रामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार

 रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत. 

Updated: Oct 2, 2014, 01:03 PM IST
 रामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार title=

मुंबई :  रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत. 

रामदास आठवले यांची बोलण्याची आपली एक शैली आहे. आपल्या शैलीमुळे आणि कवितांमुळे ते खूप प्रसिद्ध आहेत. शिघ्र कवी असल्याने ते राजकीय परिस्थितीवर ताबडतोब कविता रचतात आणि ठोकूनही देतात. राष्ट्रवादी- काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीशी आपली नाळ जोडली. शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीला फायदा झाला.  

२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयला प्रकाश जावडेकर यांच्या जागी रामदास आठवले यांना राज्यसभेची जागा दिली आणि पुन्हा एकदा आठवले खासदार म्हणून राज्यसभेत गेले. गेले काही दिवस महायुतीतील घडामोडींमध्ये आठवलेंची भूमिका महत्त्वाची होती. आठवलेंना भाजप-शिवसेना एकत्र राहवे असे वाटत होते. पण दोघांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला तेव्हा शेवटपर्यंत रामदास आठवले तळ्यात मळ्यात होते. अखेर त्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. रामदास आठवलेंसोबत असलेले दलित मतदारांचा भाजपला फायदा होऊ शकतो. तसेच भाजपकडे केंद्रात असलेल्या सत्तेचाही फायदा आठवलेंना होऊ शकतो. 

आठवलेंचा जीवनपट
लहानपणी वडिलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई काबाडकष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची खऱ्या अर्थाने तेथे जडणघडण झाली. १९७२ मध्ये दलित पॅंथर्सची स्थापना झाली. पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक मंडळी बरोबर होती. पॅंथर्समुळे जीवनाला कलाटणी मिळाली. पॅंथर्सचा झंझावात निर्माण केला.

रामदास आठवले यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. १९७१ मध्ये मुंबई गाठली. विद्यार्थिदशेपासून अन्याय, अत्याचाराविरोधात लढले . वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असत. हे वसतिगृहच गोरगरिबांचे आधारस्थान होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जात असत. हळूहळू लोकांशी संपर्क वाढत होता. प्रा. अरुण कांबळे सरांचे त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले. दलित पॅंथर्सच्या चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पालथा घातला.
जेथे जेथे दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत असे तेथे तेथे पॅंथर्स धावून जात होते. अन्यायाविरोधात पॅंथर्सच्या माध्यमांतून आम्ही आवाज बुलंद केला. आमच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रात भटकंती करीत असताना दलित समाजाबरोबरच कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, भटक्या आणि फाटक्या माणसांची दुःखही कळली. दलित समाज मला ओळखू लागला. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली. नामांतर चळवळीतही रामदास आठवले सहभागी झाले. जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला. संपूर्ण राज्यात वातावरण तापले.

नामांतराचा लढा काही वर्षे सुरू राहिला. सरकारशी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाड्याचे नामांतर झाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना ऐतिहासिक निर्णय झाला. मार्ग निघाला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच त्यांचा १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.

प्रारंभी समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून मी काम केले. पुढे मुंबई आणि पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदारही झालो. दलितांना न्याय मिळत नव्हता. गावागावांत सन्मानाने जगता येत नव्हते. अन्याय, अत्याचार पराकोटीला पोचले होते. गांजलेल्या गरीब जनतेला आम्ही पॅंथरचे बळ दिले. काळ बदलला मात्र, परिस्थिती काहीशा फरकाने तशीच आहे. "जुलमास जाळण्याला, मी विद्रोहाची वात झालो,' असे रामदास आठवले यांचे आजही प्रामाणिक मत आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.