...अन् रणधीर कपूर खवळले

मुंबई : संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्या घटस्फोटाच्या खलबतानंतर आता संजय कपूरनं 'करिश्मानं आपल्याशी हे पैशांसाठी लग्न केलं' असा आरोप केला

Updated: Jan 15, 2016, 10:11 PM IST
...अन् रणधीर कपूर खवळले title=

मुंबई : संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्या घटस्फोटाच्या खलबतानंतर आता संजय कपूरनं 'करिश्मानं आपल्याशी हे पैशांसाठी लग्न केलं' असा आरोप केला... आणि यावरून करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी मात्र आता संजयला खडे बोल सुनावले आहेत. 

'आम्ही कपूर आहोत. सर्व जण आम्हाला ओळखतात. आम्ही पैशांसाठी पळत नसतो. आमच्याकडे पैशांसोबतच टॅलेंटदेखील आहे' अशा शब्दांत त्यांनी संजयला तोंडावर पाडलंय.

 

करिश्मानं संजयला आपला जोडीदार म्हणून निवडला तेव्हाही हा निर्णय मला पसंत नव्हता. संजय थर्ड क्लास माणूस आहे. त्यानं त्याच्या पत्नीची कधीच काळजी घेतली नाही. सगळ्या दिल्लीला ठाऊक आहे की तो कसा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केलाय. 

संजय कपूर आणि करीश्मा कपूर यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी झाला होता. पण बायको आणि सून म्हणून करिश्मा नापास ठरल्याचं संजयनं म्हटलं होतं.