'मै रहू या ना रहू'...इमरान हाश्मीची अधुरी प्रेमकहाणी...

'जन्नत २', 'राझ ३' या चित्रपटातून एकत्र दिसलेली इमरान हाश्मी आणि इशा गुप्ता ही बॉलीवूडची जोडी 'मै रहू या ना रहू' या गाण्याद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. टी सीरिजचे हे गाणे नुकतेच लाँच झाले असून त्याला नेटकऱ्यांमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतोय. 

Updated: Nov 26, 2015, 10:00 AM IST
'मै रहू या ना रहू'...इमरान हाश्मीची अधुरी प्रेमकहाणी... title=

मुंबई : 'जन्नत २', 'राझ ३' या चित्रपटातून एकत्र दिसलेली इमरान हाश्मी आणि इशा गुप्ता ही बॉलीवूडची जोडी 'मै रहू या ना रहू' या गाण्याद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. टी सीरिजचे हे गाणे नुकतेच लाँच झाले असून त्याला नेटकऱ्यांमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतोय. 

गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रण करण्यात आलेय. या गाण्यात एका तरुणाची कथा सांगण्यात आलीये जो आपल्या मैत्रिणीवर प्रेम करतो. मात्र तिला हे सांगण्याची त्याला भिती वाटते आणि अखेरपर्यंत तो तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करत नाही. 

 

'धीरे धीरे से', 'चल वहा जाते है' आणि 'आ भी जा' या गाण्यानंतर भूषण कुमार यांचे हे चौथे गाणे आहे. अरमान मलिक यांनी हे गाणं गायलंय. तर अमित शर्माने दिग्दर्शन केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.