'आराध्याही लाईमलाईटला सरावलीय'

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चिमुकली आराध्या हिलाही आता लाईमलाईटची सवय झालीय... आणि आता ही गोष्ट तिच्यासाठीही सामान्य झालीय, असं म्हटलंय खुद्द ऐश्वर्यानं...

Updated: May 21, 2015, 05:49 PM IST
'आराध्याही लाईमलाईटला सरावलीय' title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चिमुकली आराध्या हिलाही आता लाईमलाईटची सवय झालीय... आणि आता ही गोष्ट तिच्यासाठीही सामान्य झालीय, असं म्हटलंय खुद्द ऐश्वर्यानं...

आराध्याच्या जन्मानंतर कित्येक दिवसांपर्यंत बच्चन कुटुंबानं आराध्याला मीडियापासून आणि कॅमेऱ्यांपासून दूर ठेवलं होतं... पण, छायाचित्रकार मात्र आराध्याला टिपण्यासाठी आतूर असत. 


ऐश्वर्या आणि चिमुकली आराध्या

लाईमलाईटमध्ये राहण्याबद्दल आराध्याची काय प्रतिक्रिया असते? असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ऐश्वर्या म्हणते, आम्ही जेव्हा कधी घराच्या बाहेर किंवा विमानतळावर जातो तेव्हा आमच्या आसपास गर्दी असते... कॅमरे लागलेले असतात. मला वाटतं की आता ही गोष्ट आराध्यासाठीही सामान्य झालीय. पण, माझ्यातली आई मात्र तिच्यासाठी संरक्षणात्मक राहील... आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे. 

मातृत्वाचा लाभ झाल्यानंतर सिनेमांच्या पसंतीस माझ्यात कोणताही बदल झाला नाही. मातृत्वामुळे या गोष्टींमध्ये फारसा बदलही झालेला नाही. मी नेहमीच देवदास, रेनकोट, धूम २, रोबोट आणि गुजारिश सारखे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे निवडले... हे सगळे सिनेमे मला करायला मिळाले... आणि लोकांनी, इंडस्ट्रीतल्या लोकांनीही मला वेगवेगळ्या सिनेमांमधून स्वीकार केलं म्हणून मी त्या सर्वांची आभारी आहे, असंही अॅशनं म्हटलंय. 

ऐश्वर्या 'जज्बा' या सिनेमातून सिनेजगतात कमबॅक करतेय. तसंच ती करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.