'अशा नेत्यांना आणि कलाकारांना लोकांमध्ये आणून चोपलं पाहिजे'

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे बॉलिवूडचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांने पुन्हा एकदा टीका करणारं वक्तव्य केलं आहे. अभिजीत यांनी म्हटलं की, सरकार अशा लोकांना आणि कलाकारांना कसं सहन करतेय. त्यांना सगळ्यांसमोर हाणलं पाहिजे.

Updated: Oct 6, 2016, 10:39 AM IST
'अशा नेत्यांना आणि कलाकारांना लोकांमध्ये आणून चोपलं पाहिजे' title=

मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे बॉलिवूडचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांने पुन्हा एकदा टीका करणारं वक्तव्य केलं आहे. अभिजीत यांनी म्हटलं की, सरकार अशा लोकांना आणि कलाकारांना कसं सहन करतेय. त्यांना सगळ्यांसमोर हाणलं पाहिजे.

अभिजीत यांचं हे वक्तव्य अशा नेत्यांसाठी आहे ज्यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील सर्जिकल अटॅकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुरावे मागितले होते.

अभिजीतने पाक कलाकाराचं समर्थन करणाऱ्या स्टार्सला देखील लक्ष्य केलं. सुपरस्टार सलमान खान, करण जोहर, महेश भट्ट या सारख्या कलाकारांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला होता.