भारताची चीनवर नजर, अरुणाचलमध्ये हवाई दल होतंय मजबूत

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर चीनकडूनही धोका होऊ शकतो त्यामुळे लष्कर हे आक्रमक पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार करण्यास सुरुवात केली आहे.

Updated: Oct 2, 2016, 04:31 PM IST
भारताची चीनवर नजर, अरुणाचलमध्ये हवाई दल होतंय मजबूत title=

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर चीनकडूनही धोका होऊ शकतो त्यामुळे लष्कर हे आक्रमक पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार करण्यास सुरुवात केली आहे.

 
वायुसेनेचे एअर कमांडर हरि कुमार यांनी म्हटलं आहे की, अरुणाचल प्रदेशमध्ये ७ अॅडवांस लँडिंग ग्राउंड्स (ALGs)मधील ५ म ग्राउंड्सचं काम सुरु झालं आहे आणि लवरपत ते पूर्ण होणार आहे. पुढील २ वर्षात बाकीच्या २ मैदानाचं देखील काम पूर्ण होईल असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय हवाई दल देखील पूर्व भागात स्वत:ची क्षमता वाढवत आहे.

इतर ठिकाणांपेक्षा येथे कामांना वेळ लागतो. आम्हाला या भागात आमची ताकद वाढवायची आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त पाकिस्तानातील दहशतवादावर चिंता व्यक्त केली आहे.