उरी हल्ला वेदनादायक- कोहली

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले.

Updated: Sep 26, 2016, 04:58 PM IST
उरी हल्ला वेदनादायक- कोहली  title=

कानपूर : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले. उरीमध्ये झालेला हा हल्ला वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया भारताचा टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं दिली आहे.

प्रत्येक भारतीयाप्रमाणे मलाही या हल्ल्याचं दु:खं झालं आहे. हे हल्ले कसे थांबवावेत किंवा तोडगा कसा काढावा हे सांगायला मी काही तज्ज्ञ नाही, पण जे जवान शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. या शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे, असं कोहली म्हणाला. ही प्रतिक्रिया देताना विराट कोहली हळवा झाला होता.

पाहा काय म्हणाला कोहली