'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत'

आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचा प्रचार करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले.

Updated: Apr 10, 2016, 10:10 PM IST
'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत' title=

गुवाहाटी: आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचा प्रचार करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान असताना वाजपेयींनाही बांग्लादेशची घुसखोरी थांबवण्यात अपयश आलं असं अमित शहा म्हणाले आहेत. 

वाजपेयींच्या तत्कालीन एनडीए सरकारनं बांग्लादेशबरोबर सीमा करार केला नाही, त्यामुळे घुसखोरीची समस्या कायम राहिली, पण आता आम्ही हा करार केला, असं वक्तव्य अमित शहांनी केलं. 

घुसखोरीची समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी केंद्राबरोबरच राज्यातही आम्हाला सत्ता द्या, असं आवाहन शहांनी मतदारांना केलं.