पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स

उरी हल्ला प्रकरणी भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स पाठवला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये 2 वेळा चकमक झाली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही भारतविरुद्ध दहशतवादी कारवायांना थारा देणार नाही.'

Updated: Sep 21, 2016, 07:34 PM IST
पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स title=

नवी दिल्ली : उरी हल्ला प्रकरणी भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स पाठवला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये 2 वेळा चकमक झाली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही भारतविरुद्ध दहशतवादी कारवायांना थारा देणार नाही.'

भारत हा पाकिस्तानला त्या दहशतवाद्यांविरोधातील पुरावे देणार आहे. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानातील औषधं, फूड आणि संपर्काची साधने मिळाली आहेत.