'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'

केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Updated: Oct 29, 2016, 06:44 PM IST
'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या' title=

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारनं OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी करणारं पत्र राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. सरकारनं जवानांना संघर्ष करायला भाग न पाडता त्यांना त्यांच्या हक्क द्यावा अशी अपेक्षाही राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.

मागच्या काही आठवड्यांमध्ये सरकारनं लष्कराबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे जवानांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाल्याचंही राहुल या पत्रात म्हणाले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी जवान सीमेवर स्वत:च्या प्राणाची बाजी लावतात. लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काहीच दिवसांमध्ये सरकारनं अपंग सैनिकांसाठीच्या निवृत्ती वेतनात कपात केली. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होत नसल्यामुळेही लष्कराचं नुकसान होत आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.