विनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले

विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.

Updated: Mar 8, 2016, 07:33 PM IST
विनयभंगाची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला जाळले title=

लखनौ : विद्यार्थिनीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे, विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून तिला जाळण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली.

अलिगडमधील एक विद्यार्थिनी अकरावीमध्ये शिकत असलेल्या, एकाने तिचा विनयभंग केला होता. तिने याची तक्रार दाखल केली, यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. 

विद्यार्थिनीला सोमवारी असंशयित व्यक्तींनी पेटवून दिले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिची प्रकृती गंभीर आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर संशय व्यक्त करण्यात आले आहे.