तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे. 

Updated: May 19, 2016, 06:01 PM IST
तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत title=

चेन्नई : तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे. 

अण्णा द्रमुक पक्षावरील नागरिकांचा विश्‍वास कमी झाल्याचे चित्र आहे. द्रमुक (डीएमके)ने त्यांना लढत दिली आहे, अद्याप सुरवातीच्या कौलानुसार चित्र स्पष्ट झालेले नाही. 

तमिळनाडूत 234 जागांसाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीवेळी 69 टक्के मतदान झाले होते.

अंतर्गत दुफळीने त्रस्त असलेल्या द्रमुक या प्रमुख विरोधी पक्षाचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे कलचाचणीत दिसून आले आहे. तरीही द्रमुक अण्णा द्रमुकला लढत देत असल्याचे दिसत आहे.