जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये  बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवून लावला आहे. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Updated: Aug 15, 2016, 10:49 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा title=

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये  बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवून लावला आहे. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे ७ जवानांसह एक पोलीस अधिकारी जखमी झाले. तर भारतीय सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  

देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरूच असताना तेथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काळजी घेतली जात असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

काश्मीरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वीही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी तसे करण्यात आले होते. कारण त्यातून पसरणाऱ्या अफवांमुळे आणि चुकीच्या माहितीमुळे हिंसाचाराची शक्यता असते.