भारत-पाक सचिव स्तरीय चर्चा तूर्तास रद्द

पठाणकोटच्या वायूसेना तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात होणारी सचिव स्तरीय चर्चा तूर्तास रद्द करण्यात आलीय. 

PTI | Updated: Jan 11, 2016, 10:08 AM IST
भारत-पाक सचिव स्तरीय चर्चा तूर्तास रद्द title=

नवी दिल्ली : पठाणकोटच्या वायूसेना तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात होणारी सचिव स्तरीय चर्चा तूर्तास रद्द करण्यात आलीय. 

येत्या १५ जानेवारी होणाऱ्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळलाय.  दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्त संस्थेनं ही माहिती दिलीय. 

दरम्यान, एएनआयलाच दिलेल्या एका स्पष्टीकरणात अजित दोवाल यांनी अशी कुठलीही मुलाखत वृत्तपत्राला दिलेली नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे चर्चा होणार असे सांगण्यात येत आहे.