भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे सात जवान ठार?

भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत.

Updated: Nov 14, 2016, 02:41 PM IST
भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे सात जवान ठार? title=

भिंबेर : भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान ठार झाले आहेत. पाकिस्ताननंच त्यांचे जवान मारले गेल्याचा हा दावा केला आहे. काल रात्री सीमारेषेवरच्या भिंबेर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून विशेषत: भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय लष्करानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.