पहिल्यांदा राहुल गांधींनी पंतप्रधानांचे केले कौतुक

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलेय. 

Updated: Sep 30, 2016, 02:30 PM IST
पहिल्यांदा राहुल गांधींनी पंतप्रधानांचे केले कौतुक title=

नवी दिल्ली : भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलेय. 

गेल्या अडीच वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पदाला साजेसे काम केलेय. मोदींना माझा पूर्ण पाठिंबा आहे, तसेच काँग्रेस पक्षाचाही मोदींना पाठिंबा आहे. दहशतावादाविरोधात पंतप्रधानांनी उचललेले पाऊल योग्य आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

भारताने केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांच्या भारताच्या या कारवाईबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वच पक्षांनी सरकारने उचललेल्या पावलाबद्दल मोदींचे अभिनंदन केले.