उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस साथसाथ

भाजपच्या विचारधारेपासून भारताला धोका आहे, मात्र मायावती यांच्या विचारधारेपासून धोका नसल्याचं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलंय. 

Updated: Jan 29, 2017, 03:21 PM IST
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस साथसाथ title=

लखनऊ : भाजपच्या विचारधारेपासून भारताला धोका आहे, मात्र मायावती यांच्या विचारधारेपासून धोका नसल्याचं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलंय. 

अखिलेश यादव आणि राहुल गांधींची लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. आरएसएसवरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला. आरएसएसची नियत साफ नसल्याचं ते म्हणाले. 

अखिलेश यादवांचा हेतू साफ असल्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. राममंदिराच्या मुद्यावरून भाजप केवळ वेळ काढत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी गंगा-यमुनासारखी पवित्र असल्याचंही ते आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप केवळ वेळ काढत असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सायकलची दोन चाकं असल्याची प्रतिक्रिया अखिलेश यादवांनी दिलीय.