महानायक सहस्त्रकाचा

अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 11, 2012, 09:26 PM IST

www.24taas.com,मुंबई
अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू उलगडले आहेत ‘महानायक सहस्त्रकाचा’, यातून.
डोळ्यात अंगार आणि शब्दात आगीची धग ही अमिताभ यांच्या संवादाची खासीयत. खर्जातला आवाज ही तर बॉलीवूडच्या शहेनशाह लाभलेली ईश्वरदत्त देणगी आहे..त्यांच्या अनेक सिनेमाचे संवाद म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी जणू सुभाषितचं.
अमिताभ कोण आहे? अमिताभ तुम्ही आम्ही सगळेचं म्हणजे अमिताभ. अमिताभ म्हणजे जिद्द , अमिताभ म्हणजे एल्गार. प्रत्येकाच्या मनात धुमसणारा संताप म्हणजे अमिताभ. प्रत्येक तरुणाच्या विचारांचं एक असं रुप आहे, जे कालही होतं आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण त्यासाठी अमिताभ यांना फार मोठा संघर्ष करावा लागलाय. आणि या संघर्षाची सुरुवातही तुमच्या आमच्यासारखीच.
आपल्या पित्याच्या सांगण्याप्रमाणे अमिताभ यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज ते अशा ठिकाणी येवून पोहोचलेत जिथं त्यांची बरोबरी करणं कोणालाच शक्य नाही. आपल्या सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत नवा इतिहास लिहिला आहे.
बॉलीवूडच्या या शहनशाहचा पहिला प्रवासही शाही होता. अलाहाबादच्या ज्या हॉ़स्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला तेथून त्यांच्या घरी जाण्यासाठी अमिताभचे पिता हरीवंशराय बच्चन यांनी एक टांगा भाड्याने घेतला होता..खरं तर त्या काळात ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे.
हरिवंशराय बच्चन यांनी या नवजात मुलाचं नाव काही तरी वेगळ ठेवण्याचं ठरवलं होतं..त्याप्रमाणे त्यांनी मुलाचं नाव इन्कलाब असं ठेवलं..मात्र समित्रानंदन पंत यांना ते नाव काही आव़डलं नाही..त्यामुळे त्यांनी मुलासाठी नवं नाव शोधलं आणि ते नाव होतं अमिताभ.
कधीही लुप्त न होणारा प्रकाश असा त्या नावाचं अर्थ. १९६३ साली अमिताभ बच्चन कलकत्त्यातील एका शिपिंग कंपनीत नोकरी करत होते. त्यावेळी त्यांचा पगार होता महिना २७० रुपये. कोलकत्त्याच्या याच हवडा ब्रीजवरुन रोज घरी जातांना अमिताभला मुंबईची आठवण होतं असे. पण त्यासाठी त्यांना आणखी काही काळ कलकत्त्यात घालवावा लागणार होता.
सिनेमात करिअर करण्याची अमिताभ यांची इच्छा होती..पण त्यासाठी परिस्थिती त्यांच्या बाजूने नव्हती..त्यामुळे अमिताभ यांनी नोकरी बरोबरच नाटकात काम करणंही सुरु ठेवलं होतं. अमिताभ यांनी सिनेमात करिअर करावं असं त्यांचे छोटे बंधू अजिताब यांची इच्छा होती. त्यामुळेच अमिताभ यांनी मुंबईच्या व्हिक्टोरीया मेमोरिअलमध्ये काही फोटो काढले होते. तेच फोटो अजिताब यांनी माधुरी सिने हंट स्पर्धेसाठी पाठवली होती..पण त्यावेळी त्याचा काही फायदा झाला नाही..

१९६८मध्ये कलकत्यात अमिताभ यांचा पगार वाढून तो १६४० रुपये इतका झाला होता...त्याच सुमारास मनोज कुमार यांच्या एका सिनेमासाठी छोटाशी भूमिका अमिताभ यांना चालून आली होती..मात्र त्या छोट्या भूमिकेसाठी नोकरी सोडणं अमिताभ यांना परवडणारं नव्हतं.
पण पुढे अमिताभ यांनी त्याच वर्षी नोकरीला रामराम केला आणि ते मुंबईत दाखल झाले. फॅमिली फ्रेंड नर्गिस यांनी मोहन देसाई यांच्या एका सिनेमासाठी अमिताभचं नाव सुचवलं होतं.. स्क्रीन टेस्ट झाली खरी पण त्यात अमिताभ यांना रिजेक्ट करण्यातं आलं..अमिताभ यांची पहिली कमाई अभिनयातून नाही तर सिनेमासाठी दिलेल्या आवाजातून झाली होती. मृणाल सेन यांच्या एका सिनेमासाठी अमिताभ यांनी आपला आवाज दिला होता....करिअरच्या सुरुवातीच्या काळात अमिताभ यांनी छोट्यामोठ्या जाहिराती केल्या..त्यासाठी त्याकाळी त्यांना ५० रुपये मानधन मिळत असे..पण अमिताभ यांचं स्वप्न मोठं होतं..त्यामुळेच ते चित्रपट निर्मात्यांकडं चकार मारीत असतं याच दरम्यान एकदा ते राजश्री प्रॉडक्शनचे ताराचंद बडजात्या यांच्याक़डं गेलं होतं..पण तिथंही त्यांचा हिरमोड झाला..असं उत्तर त्यांना मिळालं होतं.
सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही तर पुन्हा घरी न जाता टॅक्सी चालविण्याचा निश्चय अमिताभ यांनी केला होता. पण त्याच वेळी अमिताभ यांच्यासाठी हिंदी सिनेसृष्टीनं दार उघडलं होतं..अजिताब यांनी अमिताभ यांचे जे फोटो टॅलेंट हंटसाठी पाठवले होते त्या फोटोंनी अमिताभसाठी महत्वाची भूमिका बजावली.. ख्वाजा अहमद अब्बास हे आपल्या सिनेमासा