राज ठाकरे @ झी २४ तास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि झी २४ तासची टीम यांच्यातील प्रश्नोत्तराचा तास विलक्षण रंगला. झी २४ तासच्या टीमने विचारलेल्या भन्नाट प्रश्नांना राज ठाकरेंनी तितक्याचे दमदारपणे उत्तर दिल्याने एक दिलखुलास चर्चा रंगली.

Updated: Oct 28, 2011, 03:27 AM IST

झी २४ तास वेब टीम, न्यूजरूम

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि झी २४ तासची टीम यांच्यातील प्रश्नोत्तराचा तास विलक्षण रंगला. झी २४ तासच्या टीमने विचारलेल्या भन्नाट प्रश्नांना राज ठाकरेंनी तितक्याचे दमदारपणे उत्तर दिल्याने एक दिलखुलास चर्चा रंगली.

 

[caption id="attachment_3836" align="alignleft" width="300" caption="राज ठाकरे यांची 'झी' वारी"][/caption]

राज्य सरकारने महाविद्यालयातील निवडणुकांवर बंदी घातल्याने कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया बंद पडली का? या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, की मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे जाऊन या संबंधी मागणी केली होती, पण त्यांनी अर्धी मागणीच मान्य केली. त्यावेळेस महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधींना फक्त पाच महिन्यांचा कालावधी मिळतो, तो दोन वर्षांचा करावा अशी मी मागणी केली होती ती मात्र, मान्य झाली नाही. महाविद्यालयातून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून जाणाऱ्यांना कोणतेही अधिकार नसतात आणि केवळ वेळेचा अपव्यय त्यातून होतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि विद्यार्थिनींना डांबणे, निवडून आलेल्या प्रतिनिधींना पळवणे असे प्रकार सर्रास होतात यातून कार्यकर्ते किंवा नेतृत्व घडत नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

 

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं आहे, का या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, की पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुका लढवण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ माझ्याकडे नाही. त्यामुळे मी आता त्या लढवू इच्छित नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीत ठराविक मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं आणि त्यात १३ जागांवर विजय मिळवला तसंच लोकसभेच्याही फक्त ११ जागा लढवल्या त्यात लाखाच्यावर मतं मिळवली. त्यामुळेच घाई गर्दी न करता महाराष्ट्रात सर्वत्र पोहचण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसंच राज्याची सत्ता काबीज करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळेस तुम्ही एक दिवस पक्षाची जबाबदारी सांभाळायला तयार आहेत का तुम्हाला गेस्ट एडिटरप्रमाणे गेस्ट अध्यक्ष करतो, अशी चौफेर फटकेबाजीही त्यांनी केली.

 

मराठी सिनेमांच्या बाबतीत मराठी सिनेनिर्मात्यांनी यशस्वी सिनेमे काढण्यावर भर दिला पाहिजे असं ठाकरे यांनी सांगितलं. मराठी सिनेनिर्माते एकदम सत्यजीत रे किंवा बिमल रॉय यांच्यासारखे सिनेमा काढण्याचा विचार करतात. ते करण्यापेक्षा चांगले दर्जेदार आणि यशस्वी सिनेनिर्मिती केली पाहिजे, असं आपलं मत असल्याचं राज ठाकरे  यांनी व्यक्त केलं. मराठी कलाकार नाक्या नाक्यावर दिसतात. मग त्यांना थिएटरमध्ये जाऊन कोण पाहिल असा सवालही त्यांनी केला. हिंदीतले आघाडीचे अभिनेते सलमान किंवा शाहरुख हे तुम्हाला कधी सहजासहजी दृष्टीस पडत नाही. ते त्यांच्या कोषात रममाण असतात त्यांनी त्यांच्या भोवती एक वलय निर्माण केलं आहे, हे आपल्या मराठी अभिनेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

 

[caption id="attachment_3837" align="alignleft" width="201" caption="राज ठाकरे यांची मुलाखत"][/caption]

शरद पवारांनी आपल्याला महाराष्ट्रात अधिक दौरा करण्याविषयी सल्ला दिला त्यासंदर्भात ते म्हणाले की, महाराष्ट्रात तालुका पातळीवर मी आजवर पाचवेळा फिरलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याची भौगोलिक, आर्थिक, कृषी परिस्थिती मला चांगल्या रितीने माहिती आहे. आता हा सल्ला ते सुप्रियाताईँना किंवा अजितदादांना का देत नाही कदाचीत त्यांना त्यांच्याकडून फार अपेक्षा नसाव्यात, असा टोलाही राज ठाकरे यांना लगावला.

 

हिंदी ही राष्ट्र भाषा नाही असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयानेही निकाल दिला आहे. पंडित नेहरूंना इंग्रजी, डॉ आंबेडकर यांना संस्कृत तर महात्मा गांधींना हिंदी भाषेला राष्ट्र भाषेचा दर्जा दि