दीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 9, 2012, 06:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

 

गेली दीडशे वर्षे अव्याहतपणे मुंबईत कोकणी माणसांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या भाऊच्या धक्क्य़ाची स्थिती, कठिण झाली आहे.   या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत  जाण्यासाठी उतरत असत. ‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार. स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.

 

कोण आहे हा 'भाऊ'

ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळूनत्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला. त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.

 

स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅ . रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली. या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला ‘भाऊ’ हे नाव पडले ते कायमचे! कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले.

 

मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले. मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून कारनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.

 

कोकणच्या जलवाहतुकीसाठी पुढे दीडशे वर्षे वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक! रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अध्र्याअधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. १८६२ साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे.

 

हक्काचा धक्का 

होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतरत्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला.

 

कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे. सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. त्यानंतर रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा याठिकाणी अगडबंब बोट सुटत असत. आता ही वाहतूक  बंदच झाल्यात जमा आहे.  एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता सुना स