करण-अर्जुन झाले मित्र!

बॉलिवूडचे दोन दिग्गज खान आणि ते झालेत आता मित्र, असं आम्ही नाही तर खुद्द शाहरुख खान बोललाय. एका टीव्ही चॅनलवरील शोमध्ये आपला आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रमोशनसाठी गेला असता शाहरुखनं सलमानला आपला मित्र संबोधलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 6, 2013, 12:47 PM IST

www.24tass.com , झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचे दोन दिग्गज खान आणि ते झालेत आता मित्र, असं आम्ही नाही तर खुद्द शाहरुख खान बोललाय. एका टीव्ही चॅनलवरील शोमध्ये आपला आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रमोशनसाठी गेला असता शाहरुखनं सलमानला आपला मित्र संबोधलं.
काही दिवसांपूर्वी मुंबईत बाबा सिद्धीकी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सलमान आणि शाहरुख एकत्र दिसले. त्यांच्या गळाभेटीनंतर आता पुन्हा शाहरुखनं सलमानला आपला मित्र म्हटलंय. चॅनलवरील कॉमेडी शोमध्ये शाहरुखनं कपिलचा शो १० हजार रुपयांना विकत घेतो, असं म्हटलं. त्यावर कपिलनं शाहरुखची फिरकी घेत “माझा शो कशाला, बिग बॉस का नाही खरेदी करत, आता सलमान सोबत मैत्री पण झालीय”, असं शाहरुखला म्हटलं. त्यावर उत्तर देत “मी मित्राचा शो विकत घेत नाही”, असं शाहरुख बोलला.
एकूणच काय तर पहिले इफ्तार पार्टी आणि आता इंटरटेन्मेंट शोमध्ये दिसलेल्या दृश्यावरुन शाहरुख-सलमानमध्ये खरंच मैत्री झाली की काय, अशी आशा व्यक्त करण्यात येतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.