घरातून काढून टाका 10 गोष्टी, कधीच नाही येणार गरिबी

सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आणि मान सन्मान असावा. अनेक जण मेहनत करतात पण त्यांच्या खर्च ही मोठा होतो त्यामुळे सतत घरात दारिद्र्य असतं. पण कधी कधी काही वस्तू आपल्यासाठी नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी तयार करतात. घरातील अशा वस्तूंची माहिती असणं खूप गरजेची आहे.

Updated: Jan 19, 2017, 08:44 PM IST
घरातून काढून टाका 10 गोष्टी, कधीच नाही येणार गरिबी title=

नवी दिल्ली : सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आणि मान सन्मान असावा. अनेक जण मेहनत करतात पण त्यांच्या खर्च ही मोठा होतो त्यामुळे सतत घरात दारिद्र्य असतं. पण कधी कधी काही वस्तू आपल्यासाठी नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी तयार करतात. घरातील अशा वस्तूंची माहिती असणं खूप गरजेची आहे.

या गोष्टी आहेत नकारात्मक

1. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातू टाकीतून किंवा नळातून जर पाणी गळत असेल तर यामुळे आर्थिक नुकसान होतं. 

2. घरात असलेला तुटलेला आरसा हा देखील घरात नकारात्मक प्रभाव टाकतो. घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते.

3. जर तुमच्या घराच्या भींतीवर डाग पडले असतील, भीती खराब झाल्या असतील तर त्याला लवकरात लवकर ठिक करा. हे दुर्भाग्य आणि गरिबीला आकर्षित करतं.

4. जर घरात वीजेवरची कोणतीही वस्तू बंद पडली असेल तर त्याला लवकरात लवकर दुरुस्त करा किंवा मग घरातून काढून टाका.

5. घराचं छप्पर हे नेहमी साफ असावं. छप्पर स्वच्छ नसल्यास ते घरात धन येण्यास बांधक ठरतं.

6. घराच्या सजावटीसाठी सुखलेल्या फुलांचा वापर नाही केला पाहिजे. नेहमी ताजे आणि सुंगधीत फुलांचा वापर करा.

7. तुमच्या घरात असलेल्या झाडावर जर वाळलेली पाने दिसत असतील तर ती तोडून टाका.

8. घरात कबूतरचा घरटे अस्थिरता आणतात. घरावर जर असं घरटं असल्यास ते काढून टाका.

9. घराजवळ असलेला मधमाशांचा पोळा हा देखील अशूभ मानला जातो. त्यामुळे तो ही घराजवळ असू नये.

10. वटवागुळ दिसणं हे तसं अशूभ मानलं जातं. पण घरात त्याचा प्रवेश होणे हे देखील अशुभ आहे.