एप्रिल-जून दरम्यान होणार मोठा विद्ध्वंस - ज्योतिषाचार्यांचा दावा

काशीच्या एका ज्योतिषाचार्यांनी विध्वंस होणार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Mar 15, 2016, 11:02 AM IST
एप्रिल-जून दरम्यान होणार मोठा विद्ध्वंस - ज्योतिषाचार्यांचा दावा title=

मुंबई : काशीच्या एका ज्योतिषाचार्यांनी २० एप्रिल ते २६ जून दरम्यान आकाशात काही अशुभ खगोलीय घटना होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे याचा ग्रहांवर मोठा परिणाम होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या काळात शनी आणि मंगळ ग्रह हे वक्र होतील त्यामुळे भारत तसेच इतर देशांमध्ये देखील मोठा विध्वंस होणार असल्याचं म्हटलं आहे.

२० एप्रिल ते २६ जून या काळात भूकंप, महामारी, सुनामी, विश्व युद्ध आणि महापूर या सारख्या घटना होणार असल्याचा दावा केलाय. ज्योतिषाचार्य म्हणतात की, धनु, मीन, वृषभ आणि वृश्चिक या राशींवर याचा मोठा परिणाम होणार आहे. या दरम्यान चांडाल योग बनणार आहे. हजारो वर्षानंतर असा योग येत आहे. हे खूपच अशुभ असल्याचं ही त्यांनी म्हटलंय.

२० एप्रिल ते २६ जून या काळात २/३ भू-भाग हा यामुळे प्रभावित होऊ शकतो. आकाशात होणाऱ्या या ग्रहांच्या हालचालींचा मोठा परिणाम हा पृथ्वीवर होणार असल्याचं ज्यातिषाचार्य यांनी म्हटलं आहे.