केवळ मुंबईतीलच नव्हे तर देश विदेशातील संगीत रसिक ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करतात ते गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये १ डिसेंबर ते ३ डिसेंबर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र ललित कला निधीने ३५ व्या गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन करताना त्याच्या संपन्न परंपरेची जपणुक करत शास्त्रिय संगीतातील दिग्गजांना आमंत्रित केलं आहे....
Updated: Nov 19, 2011, 02:24 PM IST
झी २४ तास वेब टीम, मुंबई
केवळ मुंबईतीलच नव्हे तर देश विदेशातील संगीत रसिक ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करतात ते गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये १ डिसेंबर ते ३ डिसेंबर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र ललित कला निधीने ३५ व्या गुणीदास संगीत संमेलनाचे आयोजन करताना त्याच्या संपन्न परंपरेची जपणुक करत शास्त्रिय संगीतातील दिग्गजांना आमंत्रित केलं आहे....
संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबर २०११ रोजी सांयकाळी पंडित विश्व मोहन भट्ट यांचे मोहन वीणा वादन आणि बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाचा स्वर्गीय आनंद रसिक श्रोत्यांना लुटता येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ डिसेंबर २०११ रोजी सांयकाळी ६.३० वाजता पंडित सूहास व्यास यांचे गायन आणि पंडित हरीप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादनाची मैफिल सजणार आहे. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर २०११ रोजी पंडित श्रीनिवास जोशींचे शास्त्रिय गायन, उस्ताद अमजद अली खान यांचे सरोद वादन आणि संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने सांगता होणार आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.