नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी  उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.

Updated: Jan 19, 2018, 07:55 PM IST
नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल title=

मुंबई : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेला पत्रकार परिषद घेऊन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली, असा थेट सवाल उपस्थित केलाय.

 राणे पत्रकार परिषद:

- नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणण्याचा घाट शिवसेना घालत आहे
- कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय दुटप्पी
- 18 गावातील जनतेचा, शेतकाऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध
- पैशांसाठी कोकण भास्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे
- आंब्याचे 40 हजार मेट्रिक टन आहे,  एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली 
- या भागात 7 लाख आंब्याची झाडं आणि 2 लाख काजूची झाडं आहेत
- जगातला प्रसिद्ध देवगड आंबा याच क्षेत्रातल
- सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान
- राज्याचे 'उद्योगी' मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच
- उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली
- विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना धमक्या दिल्या जातायत, सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील असं पत्र देण्यात आलंय
- त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला
- वालम यांना मातोश्रीत बोलवून दम दिला जातोय
- पोलीस, जिल्हाधिकरी गावकऱ्यांना सांगतात अधिकचं पॅकेज घेऊन जमिनी देऊन टाका
- शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करतायत
- खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याची माहिती आहे
- महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा शिवसेनेच्या विरोधाला विरोध
- आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही
- अधिकऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करू
- काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही
- मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे
- मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे
- माधव गडगीळांच्या अहवालावर मी समाधानी नाही
- अणुऊर्जा प्रकल्पाचा अभ्यास करून जेव्हा पर्यावरण विरोधी नसल्याचं पटलं तेव्हा मी स्वतः मान्यता दिली
- इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मी उद्योग मंत्री असतांना जरी झाला असला तरी आज मी स्थानिकांच्या पाठीशी उभा राहणार
- विनायक राऊत दिल्लीत हक्कभंग आणणार म्हणतात, पण हक्कभंग ते हिंदी किंवा इंग्रजीत आणू शकतात, त्यांची पंचाईत होईल