विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार

महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे

Updated: Jul 5, 2021, 05:11 PM IST
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार title=

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं (Maharashtra Education Department) राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा, असं यात नमुद करण्यात आलं आहे.

मार्गदर्शक सूचना

- शाळेत विद्यार्थ्यांना टप्याटप्याने बोलवण्यात येणार 

- कोविड संबंधी नियमांचे पालन करावे लागणार 

- एक बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर 

- एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी 

- सतत हात साबणाने धुणे,मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार 

- कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणार 

- लगेच कोरोना चाचणी करावी लागणार

- संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी

- एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे

- स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं, असं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.