मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व नियम हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला.  

Updated: Mar 31, 2022, 05:31 PM IST
मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले title=

मुंबई : महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) सर्व निर्बंध हटवण्यात (Corona Restrictions Removed) आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला.

मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनंतर राज्यात यंदा गुढी पाडवा सण मोठ्या उत्साहात आणि शोभायात्रा काढून साजरा करता येणार नाही. तसंच रमझान आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहात साजरी करता येणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण उत्सावासह अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसंच सणांच्या तोंडावर निर्बंध हटवण्यात यावेत अशी मागणीही होत होती. 

यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंझ नसल्याचं जाहीर केलं आहे. 2 तारखेला 

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केलं. 

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. 

पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

मास्क वापरण्याची सक्ती नाही
कोरोनाचे निर्बंध हटवण्याबरोबरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क वापरणं आता ऐच्छिक असणार आहे.