मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरला न जाण्याचा निर्णय

विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय

Updated: Jul 22, 2018, 02:51 PM IST
मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरला न जाण्याचा निर्णय title=

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आषाढीला पंढरपुरात जमलेल्या सुमारे १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट काही लोकांनी आखला आहे. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच महापूजेला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. वारकऱ्यांना अशाप्रकारे वेठीला धरणं चुकीचं आहे. असं करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आषाढी एकादशीच्या महापूजेला मुख्यमंत्री जाऊ न शकल्याच्या घटना याआधीही इतिहासात घडल्यात आहेत.