...त्या बाजार समित्या बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रोखठोक इशारा दिलाय.

Updated: Oct 26, 2017, 07:02 PM IST
...त्या बाजार समित्या बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम   title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रोखठोक इशारा दिलाय.

अनेक बाजार समिती संचालक राजकारणासाठी सरकारी योजना राबवत नाहीत... जे शेतमाल तारण योजना राबवणार नाहीत, अशा बाजार समित्या बरखास्त करण्यात येतील, असा दम मुख्यमंत्र्यांनी भरलाय. 

राज्यातील भाजप सरकारच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्तानं 'झी २४ तासटचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत ते बोलत होते.