घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली

Updated: Jul 20, 2019, 03:15 PM IST
घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या   title=
संग्रहित छाया

कल्याण : घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडलाय. राज पाटील असे या पतीचे, तर वैशाली असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे. वैशाली ही केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची मुलगी आहे. 

मलंगगड परिसरातल्या वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील याचं दहा वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या माणेरे गावात राहणाऱ्या वैशाली भोईरसोबत लग्न झालं होतं. मात्र पत्नी आवडत नसल्याने राज याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातूनच शुक्रवारी संध्याकाळी राज याने धारदार शस्त्राने वैशालीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः पोलिसांना याची माहिती दिली. 

वैशालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. तर राज पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मलंगगड परिसरात तणावाचे वातावरण आहे.