मोठी बातमी : कोरोनाचा राज्यात पाचवा बळी

६३ वर्षीय महिलेचा मृत्यू   

Updated: Mar 26, 2020, 06:06 PM IST
मोठी बातमी : कोरोनाचा राज्यात पाचवा बळी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना व्हायरसचा मुंबईत आणखी एक बळी गेला आहे. ६३ वर्षीय महिलेचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला कोरोनामुळे हा राज्यातील पाचवा बळी ठरला आहे. 

कोरोनाचा हा वाढता विळखा पाहता ही चिंताजनक बाब ठरत आहे. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बळींची संख्या आता १४वर पोहोचली आहे. प्रशासनाने लॉकडाऊन करुनही मुंबईकरांचा वावर, मंडईतील गर्दी काही केल्या कमी होत नाही आहे त्यामुळे आता तरी मुंबईकरांना परिस्थितीचं गांभीर्य समजतं का हाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण, त्याचं नागरिकांनी स्वयंशिस्तीने पालन करणं अपेक्षित आहे. तसं मात्र होताना दिसत नाही. परिणामी मुंबईत कोरोना फोफावताना दिसत आहे.