मुंबईतील गोविंदाचा नवी मुंबईत शॉक लागून मृत्यू

 मुंबईतील गोविंदाचा ऐरोली येथे मृत्यू शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना संध्याकाळी घडली. यामुळे गोविंदा उत्सहाला गालबोट लागले. पावसामुळे गेटला शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Updated: Aug 15, 2017, 10:05 PM IST
मुंबईतील गोविंदाचा नवी मुंबईत शॉक लागून मृत्यू title=
संग्रहित छाया

नवी मुंबई : मुंबईतील गोविंदाचा ऐरोली येथे मृत्यू शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना संध्याकाळी घडली. यामुळे गोविंदा उत्सहाला गालबोट लागले. पावसामुळे गेटला शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ऐरोली येथील 'सुनील चोगुले स्पोर्ट्स असोसिएशन'च्यावतीने आयोजित दहीहंडीमध्ये शॉक लागून  गोविंदाचा मृत्यू झाला. मैदानाच्या गेटला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पावसामुळे या विद्युत रोषणाईमुळे करंट पास झाल आणि गेटला शॉक लागला. 

दहीहंडी खेळून बाहेर पडत असताना शॉक लागला. रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदाचे नाव जयेश सरळे आहे. तो मुंबईतील चुनाभट्टीमधील प्रेमनगर मित्र मंडळचा गोविंदा आहे.