Breaking : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा; शिवदीप लांडे यांची FB पोस्ट

महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून मोठी माहिती दिली आहे.

Updated: Mar 21, 2021, 07:50 PM IST
Breaking : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा; शिवदीप लांडे यांची FB पोस्ट  title=

मुंबई -  राज्यातील राजकीय वातावरण ढवळून  काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.

मनसुख हिरेन यांच्या  हत्येचा छडा लागला आहे. अशी माहिती शिवदीप लांडे यांनी  दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.