रत्नागिरीत मच्छिमार बोटीला अपघात, एका खलाशाचा मृत्यू

रत्नागिरीत मच्छिमारांती बोट बुडून अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झालाय. 

Updated: Aug 5, 2017, 01:01 PM IST
रत्नागिरीत मच्छिमार बोटीला अपघात, एका खलाशाचा मृत्यू title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या केशळी समुद्रात मच्छिमार करण्यासाठी जाणारी बोट उलटली यामध्ये एका खलाशाचा मृत्यू झालाय तर तीन खलाशांना वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आलंय.

पहाटे ही बोट मच्छिमारी करण्यासाठी खोल समुद्रात निघाली होती मात्र समुद्र खवळलेला असल्या कारणाने एका उंच लाटेमुळे बोटीची नाल फुटली आणि ही बोट उलटली झाली आणि बोटीवरील एकुण आठ खलाशी समुद्राच्या पाण्यात पडले यामध्ये चार खलाशी पोहत किना-यावर आले तर उर्वरित तीन खलाशांना स्थानिक मच्छिमारांनी वाचवलं परंतु एका खलाशाचा यामध्ये मृत्यू झालाय...

सलाम श्रीवर्धनकर असं मृत खलाशाचं नाव असून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आलंय...दापोलीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत..