किसानसभा आयोजित मोर्चा मुंबईच्या वेशीवर

किसानसभेनं आयोजित केलेला मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 10, 2018, 10:17 PM IST
किसानसभा आयोजित मोर्चा मुंबईच्या वेशीवर title=

ठाणे : किसानसभेनं आयोजित केलेला मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलाय. गेल्या सहा तारखेला नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या या मोर्चात सुमारे 30 हजार आदिवासी शेतकरी मुंबईच्या दिशेनं पायी चालत सहभागी झालेत. त्यात मोठ्यासंख्येनं आदिवासी बांधवही सहभागी झालेत.

मंत्रालयाला घेराव घालण्याचाही मानस

12 मार्चला हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होईल. तिथूनच मंत्रालयाला घेराव घालण्याचाही मोर्चेक-यांचा मानस आहे. तत्पूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावर हजारोंच्या संख्येनं उतरलेल्या मोर्चेक-यांनी सा-यांचं लक्ष वेधून घेतलं. तळपत्या उन्हाची तमा बाळगता हे आदिवासी शेतकरी बांधव आपल्या वनजमीनीच्या हक्कासाठी सरकारविरोधात एल्गार करत आहेत.