नगरमधल्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार - रामदास कदम

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगनमताने हत्या झाल्याचा घणाघाती आरोप

shailesh musale Updated: Apr 8, 2018, 06:08 PM IST
नगरमधल्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार - रामदास कदम title=

अहमदनगर : केडगाव इथे शिवसैनिकांच्या झालेल्या हत्या भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगनमताने झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याने या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच असल्याचा आरोप करत उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं रामदास कदम म्हणाले. या घटनेला जबाबदार एक पोलीस निरिक्षक आणि एक डीवायएसपींना तातडीने निलंबीत करण्याची मागणी कदम यांनी केली.

शिवसेनेची मागणी

अहमदनगर केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर, शिवसेना आपल्या मागणीवर आक्रमक झाली आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सर्व मुख्य आरोपींना अटक केल्याशिवाय, अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

२ आमदार अटकेत

यापूर्वी अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि अरुण जगताप यांच्यासह अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे.