भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 कर्मचारी जखमी

 तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.

Updated: Jul 4, 2021, 08:22 AM IST
 भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 कर्मचारी जखमी  title=

मुंबई : तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 5 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. 

दरम्यान जखमी रूग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्व रूग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यानंतर आगीवर यश मिळवण्यास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. आणि त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती.