अब्दुल सत्तार नाराज, शिवसेनेकडून मनधरणीचे प्रयत्न

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते अब्दुल सत्तार हे नाराज आहेत.

Updated: Jan 4, 2020, 10:23 AM IST
अब्दुल सत्तार नाराज, शिवसेनेकडून मनधरणीचे प्रयत्न  title=

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते अब्दुल सत्तार हे नाराज आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठवले आहे. या विषयी अर्जुन खोतकर यांच्याशी संवाद साधला असता मी तुमच्याशी थोड्यावेळाने या विषयावर बोलेन असे त्यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 

आम्ही नेहमी भेटतो, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी ही भेट असल्याचे खोतकर म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा अध्यक्ष होऊच द्यायचा नाही अशी भूमिका अब्दुल सत्तार ठाम आहेत. पण जिल्हाध्यक्ष पद हे काँग्रेसला द्यावे अशी शिवसेनेची भूमिका आहे. असे बंड करुन चालणार नाही. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात असे सत्तार यांना सांगण्यात आले आहे. तसेच सत्तार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. 

लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्ह्यातून काँग्रेसला संपवू असा शब्द त्यांनी दिला. पण विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली आणि शिवसेना, काँग्रेस एकत्र आले. यामुळे सत्तार यांची गोची झाली. आताही सत्तेची समीकरण शिवसेनेच्या बाजुने असल्याने जिल्हा अध्यक्ष हा शिवसेनेचा असावा अशी सत्तार यांची इच्छा आहे. पण जिल्हा अध्यक्ष पद काँग्रेसकडे जावे अले महाविकास आघाडीचे ठरले आहे. यामुळे सत्तार यांची मनधरणी करण्यात खोतकर यशस्वी होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.