समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करणार- अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

Updated: Jun 21, 2018, 10:50 PM IST

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुथ कमिटीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि निवडणूकांसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मतांचा विभाजन टाळलं पाहिजे. यासाठी राज्यातील समविचारी पक्ष त्यात राष्ट्रवादी, प्रकाश आंबेडकर, बसपा यांना सोबत घेऊन भाजपाचा पराभव करण्यासाठी सज्ज होण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तर लोकांना जेवायला नाही आणि मोदी सर्वाना योगा करायला लावत आहेत. परदेशातून दाऊद आणू म्हणणारे परदेशातून साखर घेऊन आले अशी टीकाही त्यांनी केली.