अहमदनगरमध्ये तलाव फुटला ; गावकऱ्यांची सुटका

मुसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या अरणगावमधला पिंपळडोह हा तलाव काल रात्री अचानक फुटला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 21, 2017, 09:46 AM IST
अहमदनगरमध्ये तलाव फुटला ; गावकऱ्यांची सुटका  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या अरणगावमधला पिंपळडोह हा तलाव काल रात्री अचानक फुटला. त्यामुळे आलेल्या पुरात तब्बल ३२ जण अडकले होते. पण आता या सर्वांची सुटका करण्यात आली आहे.

या तलावाच्या पाण्यानं वाळूंज आणि पारगाव या दोन गावांना धोका निर्माण झाला होता. सुरुवातीला सैन्याच्या जवानांनी या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बोट नसल्यानं त्यांना बाहेर काढण्यात यश आलं नाही.

यानंतर एनडीआरएफचं एक पथक इथं दाखल झालं आणि त्यांनी पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढलं. सध्या सगळे गावकरी सुरक्षित असल्याचा दावा प्रशासन करत आहे. 

मात्र, अचानक उद्भवलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बचाव पथकाच्या तत्परतेमुळे यात कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.