राज्यात आज कोरोनाचे १६,४०८ रुग्ण वाढले, तर २९६ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ७,६९० रुग्णांची कोरोनावर मात

Updated: Aug 30, 2020, 08:55 PM IST
राज्यात आज कोरोनाचे १६,४०८ रुग्ण वाढले, तर २९६ रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : आज राज्यात एका दिवसात कोरोनाचे १६,४०८ रुग्ण वाढले आहेत, तर २९६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे ७,६९० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५,६२,४०१ एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ७२.०४ टक्के एवढा झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७,८०,६८९ एवढी झाली आहे. यापैकी १,९३,५४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २४,३९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या १३,०९,६७६ जण होम क्वारंटाईन असून ३५,३७३ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत ४०,८४,७५४ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.