बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई 'या' कारणामुळे होत्या आधारस्तंभ

Ramabai Ambedkar Birth Anniversary : बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई यांच्या माहित नसलेल्या गोष्टी 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 7, 2024, 11:53 AM IST
बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई 'या' कारणामुळे होत्या आधारस्तंभ title=

डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका गरीब दलित कुटुंबात झाला रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात जन्मलेल्या रमाबाई आंबेदर यांना रमाई म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर रमाबाईंचा खूप प्रभाव होता. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. एवढंच नव्हे तर त्यांनी सामाजिक न्याय आणि सुधारणांसाठी केलेल्या बाबासाहेबांच्या प्रयत्नांनाही पाठिंबा दिला. रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया. 

माहेरच्या रमाई

1898  मध्ये जन्मलेल्या रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव भिकू धात्रे आणि आईचे नाव रुक्मिणी होते. त्याचे वडील पोर्टर म्हणून काम करत होते आणि मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकले. रमाबाईंच्या वडिलांनी दाभोळ बंदरातून मासळीच्या टोपल्या बाजारात नेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. रमाबाईंनी त्यांचे आई-वडील फार लवकर गमावले. यानंतर काकांनी त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा गोराबाई, मीराबाई आणि शंकर यांना मुंबईत आणून वाढवलं. 1906 मध्ये भायखळा मार्केटमध्ये रमाबाईंचा विवाह बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी रमाबाई आंबेडकर या नऊ वर्षांच्या तर बाबासाहेब 15 वर्षांचे होते. रमाबाई त्यांचे पती भीमराव आंबेडकर यांना प्रेमाने 'साहेब' म्हणत आणि आंबेडकर त्यांना 'रामू' म्हणत.

(हे पण वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य)

बाबासाहेबांना कायम प्रोत्साहन 

रमाबाईंनी आंबेडकरांच्या महत्त्वाकांक्षेला कायमच पूर्ण पाठिंबा दिला. बाबासाहेबांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कायमच प्रोत्साहन दिले. बाबासाहेब जेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी परदेशात होते तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण त्यामुळे बाबासाहेबांना त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून कधीच रोखले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनाही कळू दिले नाही. त्यामुळे त्यांनी कायमच बाबासाहेबांना प्रोत्साहन दिलं आहे. 

कठीण प्रसंगांचा केला सामना 

बाबासाहेब परदेशात असताना रमाबाईंना भारतात अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. रमाबाई शेणाची पोळी बनवायच्या आणि डोक्यावर घेऊन विकायच्या. एवढंच नव्हे तर स्वयंपाकासाठी देखील त्याचाच वापर केला. आंबेडकरांना परदेशात डॉक्टरेट ऑफ सायन्ससह जगातील सर्वोच्च शैक्षणिक पदव्या मिळविण्यात रमाबाई यांचा खूप मोठा पाठिंबा होता. 

(हे पण वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार)

भीमराव-रमाबाई यांचं कुटूंब 

भीमराव आंबेडकर आणि रमाबाई यांना एक मुलगी असून तिचे नाव इंदू आणि चार मुलगे ज्यांची नावे यशवंत, गंगाधर, रमेश आणि राजरत्न अशी होती. परंतु त्यांच्या चार मुलांचा मृत्यू झाला. त्यांचा मोठा मुलगा यशवंत हा एकमेव वाचला होता. रमाबाई आंबेडकर यांचे 26 मे 1935 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा भीमराव आंबेडकर आणि रमाबाई यांच्या लग्नाला २९ वर्षे झाली होती.

बाबासाहेबांवर रमाबाईंचा प्रभाव 

बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या “थॉट्स ऑफ पाकिस्तान” या पुस्तकात रमाबाईंचा त्यांच्या जीवनावरील प्रभाव मान्य केला आहे. त्यांनी त्यांचे 'थॉट्स ऑन पाकिस्तान' हे पुस्तक त्यांच्या प्रिय पत्नी रमाबाई यांना अर्पण केले. सामान्य भीमाचे डॉ.आंबेडकरांमध्ये रूपांतर करण्याचे श्रेय रमाबाईंना जाते असे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.