ब्रिटनचे पीएम ऋषि सुनक यांच्या एका गोष्टीने भारतीय पालकांचे डोळे उघडतील, मुलांसाठी फक्त प्रेम पुरेसं नाही

Parenting Tips : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी असा सल्ला दिला आहे, जो कदाचित प्रत्येक भारतीयाला मान्य असेल. मुलांकरिता फक्त प्रेम पुरेसं नसतं. काही इतर गोष्टीही ठरतात खास.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 11, 2023, 02:57 PM IST
ब्रिटनचे पीएम ऋषि सुनक यांच्या एका गोष्टीने भारतीय पालकांचे डोळे उघडतील, मुलांसाठी फक्त प्रेम पुरेसं नाही  title=

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे स्वतः दोन मुलींचे वडील आहेत. वडील आणि पालक म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. एका मुलाखतीत ऋषी यांना विचारण्यात आले होते की ते पालक म्हणून इतरांना काय सल्ला देतात?

या प्रश्नावर ऋषी यांनी उत्तर दिले की, प्रत्येक पिढीच्या पालकांना मी सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पालकांच्या संपर्कात राहा कारण तुमच्या मुलांच्या संगोपनात तुम्हाला त्यांची कधीही गरज भासू शकते. ऋषी सुनक यांचे हे विधान जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल की ते अगदी भारतीय संस्कारांना धरून बोलले आहेत आणि बऱ्याच अंशी ते बरोबरही बोलले आहेत.

ऋषी सुनक यांचा हा सल्ला लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की, मुलांच्या संगोपनात आजी-आजोबांचे काय योगदान आहे.

ऋषी सुनक यांचा व्हिडीओ

मिळतं अपार प्रेम 

Helpmegrowutah.org नुसार, मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडून अपार प्रेम मिळते आणि मुले प्रेमळ आणि आनंदी वातावरणात वाढतात. आई-वडील आणि आजी-आजोबांच्या प्रेमात मुलाला सुरक्षित वाटते. याचा फायदा मुलांनाच नाही तर आजी-आजोबांनाही होतो. ते आनंदी राहतात आणि दीर्घकाळ जगतात.

संस्कृतीचा अभ्यास 

मुलांना आजी-आजोबांकडून त्यांच्या कुटुंबाची संस्कृती आणि सभ्यता जाणून घेण्याची संधी मिळते. तो आपल्या कुटुंबाच्या गोष्टी मुलांना सांगतो आणि मुलांसाठी ते केवळ मनोरंजनच नाही तर ते आपल्या कुटुंबाच्या इतिहासाशी देखील जोडू शकतात.

राहतात सुरक्षित 

जसे ऋषी सुनक यांनी सांगितले की, पालक बनल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पालकांचा पाठिंबा असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही दोघेही काम करत असाल किंवा तुम्हाला अचानक कामानिमित्त बाहेर जावे लागले तर तुमच्या पालकांपेक्षा मुलांसाठी सुरक्षित जागा असू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला कोणतीही चिंता न करता त्यांच्यासोबत सोडू शकता.

आरोग्य राहत सुदृढ

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जेव्हा आजी-आजोबा आपल्या नातवंडांच्या संगोपनात गुंतलेले असतात तेव्हा ती मुले निरोगी असण्याची शक्यता जास्त असते आणि या मुलांना भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या होण्याची शक्यता कमी असते.

चांगले संस्कार मिळतात

मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडून चांगले संस्कार मिळतात. पीएचडी केन कॅनफिल्ड यांनी त्यांच्या 'आजी आजी-आजोबा मूल्यांचे नैसर्गिक प्रसारक आहेत' या लेखात लिहिले आहे की मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडून चांगले संस्कार पाहायला मिळतात. चिकाटी, निष्ठा, परिश्रम, संयम आणि त्याग हे गुण मुले आजी-आजोबांकडून शिकतात. आजी-आजोबा घरी असताना पालकांनाही खूप दिलासा मिळतो आणि सुटकेचा नि:श्वास टाकता येतो. जर तुमचे आईवडील तुमच्यासोबत राहत असतील तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या संगोपनात त्यांच्याकडून खूप मदत मिळेल.