पाकिस्तानच्या १ गोळीचं उत्तर १० गोळ्यांनी देऊ - हंसराज अहिर

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या नापाक हरकतींवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 20, 2018, 10:33 AM IST
पाकिस्तानच्या १ गोळीचं उत्तर १० गोळ्यांनी देऊ - हंसराज अहिर title=

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सुरु असलेल्या नापाक हरकतींवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तान विकृत विचारांचा

हंसराज अहिर म्हणाले, 'पाकिस्तान विकृत विचार करतो आणि त्याच्या १ गोळीचं उत्तर १० गोळ्यांनी दिलं जाईल. भारतात दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. हा त्यांचा स्वभाव बनला आहे. आमचं गृह मंत्रालय असो, संरक्षण मंत्रालय किंवा जम्मू-काश्मीर पोलीस, प्रत्येकजण समन्वय साधून पाकिस्तानला उत्तर देतो.'

१ गोळीला १० गोळींनी उत्तर

'पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आपण गोळीबार आधी नाही केली पाहिजे. पण त्या बाजुने जर १ गोळी चालली तर आपण १० गोळ्या चालवल्या पाहिजे. भारतीय सैनिक आपल्या नागरिकांना वाचवत आहेत आणि पाकिस्तान कधीच नाही बदलू शकत हे सत्य आहे. असं देखील अहिर म्हणाले.