पाकिस्तानने ५५ भारतीय मच्छिमारांना घेतलं ताब्यात

गुजरातमधील कच्छ जवळ शुक्रवारी रात्री 9 बोटी आणि 55 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. एका आठवड्यात 13 बोटी आणि 79 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे.

Updated: Nov 11, 2017, 05:12 PM IST
पाकिस्तानने ५५ भारतीय मच्छिमारांना घेतलं ताब्यात title=

अहमदाबाद : गुजरातमधील कच्छ जवळ शुक्रवारी रात्री 9 बोटी आणि 55 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. एका आठवड्यात 13 बोटी आणि 79 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवारी कच्छमधील हरामी नाल्याजवळ बीएसएफने 5 पाकिस्तानच्या बोटी पकडल्या होत्या. या बोटीमध्ये 3 पाकिस्तानी होते.

गेल्या महिन्यात देखील बीएसएफने पाकिस्तानातील एका मच्छीमारला पकडले होते. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर ही बोट जप्त केली होती.