बॉटलबंद पाण्यासंदर्भात मोठा निर्णय, FSSAI चा निर्णय

 1 एप्रिल 2021 पासून हे निर्देश अंमलात येणार 

Updated: Mar 27, 2021, 02:49 PM IST
बॉटलबंद पाण्यासंदर्भात मोठा निर्णय, FSSAI चा निर्णय  title=

नवी दिल्ली : एफएसएसएआयआयने (FSSAI) बाटलीबंद / पॅकेज  पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी बीआयएस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात एफएसएसएएआयने ही सूचना दिली आहे. 1 एप्रिल 2021 पासून हे निर्देश अंमलात येणार आहेत.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने पॅकेज केलेले पाणी आणि मिनरल पाणी असलेल्या कंपन्यांचे परवाने मिळविण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो(BIS)चे प्रमाणपत्र (Certification)आवश्यक  आहे. एफएसएसएएआयने ही सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2008 नुसार, सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना (FBO) कोणताही खाद्य व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परवाना / नोंदणी घेणे बंधनकारक असणार आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक (प्रतिबंध आणि विक्रीवरील निर्बंध) विनियम २०११ नुसार, BIS प्रमाणन चिन्हानंतरच कोणीही पॅकेजबंद पिण्याचे पाणी किंवा मिनरल पाणी विकू शकणार आहे.

यापूर्वी 2019 मध्ये, रेल्वे स्थानकांवरील अनेक स्टॉल्समध्ये अनधिकृत ब्रँडच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री समोर आली होती. भ्रष्टाचाराच्या मुळावर पोहोचण्याच्या उद्देशाने प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त विशेष मोहिमेमध्ये सातत्याने कारवाई करीत होते.

यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वाणिज्य निरीक्षकांनी 1 आदेश जारी केला. विक्रेत्याकडे अनधिकृत ब्रँडचे पाणी मिळाल्यास ते प्रवाशांना विनाशुल्क वितरीत केले जाईल असे या आदेशात म्हटले आहे.

सर्व स्टॉल्सवर ऑर्डरची प्रत चिटकवण्यात आली आहे. यानुसार रेल नीर व अन्य 6 मंजूर ब्रॅण्ड केवळ पाणी विकू शकतात. बिलासपूर विभागाच्या वाणिज्य विभागाने 1 महिन्यांपूर्वी हा नियम जारी केला.

रेल्वेने सर्व विभागीय प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांना (PCSC)अनधिकृत पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या विक्रीवर कारवाई करण्यास सांगितले होते. जर एखादा विक्रेता अनधिकृत ब्रँडचे पाणी विकत असल्याचे दिसून आले तर त्याला दंड भरण्यास सांगितले गेले.